मुंबई – विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सुरक्षा कमी केल्याने भाजप नेते राज्य सरकारवर टीका करत आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करा असं म्हंटल आहे. याबाबत शरद पवार अनिल देशमुखांना पत्र लिहून मागणी करणार आहेत. गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
एखाद्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे? यावर सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवाला नुसार अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणीही विरोधी पक्षाचा आहे, म्हणून सुरक्षा कमी करण्यात आली नाही. समितीच्या अहवालनुसार थ्रेट परसेप्शन किती यावर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
मात्र फक्त विरोधी पक्षातील नेत्यांनीच सुरक्षा कपात का करण्यात आली? असा सवाल देखील आहे. गृहमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे समितीच्या अहवालात फक्त विरोधी पक्षातील बड्या नेत्यांची नवे का असावीत? कि जसे विरोधकांकडून आरोप केले जात राजकीय आकसापोटी सत्तेत असल्याने भाजप परत सत्तेत येऊ नये म्हणून केलेली ही नवी राजकीय खेळी तर नाही ना?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे शरद पवार यांचे हे वक्तव्य हे विरोधी पक्षातील नेत्यांच्या समाधानासाठी केलेले वक्तव्य आहे की फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर अन्याय होऊ नये म्हणून केले वक्तव्य? असा सवाल देखील उपस्थित होतो.
मात्र शरद पवार हे राजकारणातील दिग्गज नेते आहेत, अनेक वर्षे राजकारणात राहून त्यांनी सर्वसामान्यांना मदत केली आहे. अजूनही करत आहेत. आपल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी गरजू आणि सर्वसाम्नायांसाठी तसेच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शरद पवार या व्यक्तिमत्वाचे अनेक चाहते आहेत त्यामुळे असा बड्या नेत्याला सुरक्षा देणे देखील महत्वाचे आहे.