पंढरपूर : एकनाथ खडसे हे सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहे. मात्र, ब्राह्मण हेही बहुजन असल्याने फडणवीस बहुजन आहेत, असा जावई शोध केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे.
आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आले असता ते बोलत होते. फडणवीस यांनी अतिशय चांगल्या रितीने काम केले असे सांगताना भाजपने ज्येष्ठांना विश्रांती देत तरुणांना संधी दिल्याने खडसे यांना बाजूला ठेवले होते. खडसे यांना एखादे मंत्रिपद मिळेल मात्र त्यांच्या मागे कोणीही जाणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.
मंत्री आठवले यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांची भेट
अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी नुकसानग्रस्तभागाचा दौरा केला. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेतल्याने फडणवीस यांची आणि आमची तोंडे बंद होणार नाहीत, असे सांगत खडसे यांच्यामुळे काही फरक पडत नसल्याचे आठवले म्हणाले.
या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत तसेच एकरी पन्नास हजार रुपये मिळावेत अशी आमची मागणी आठवलेंनी केलीय. केंद्र सरकार मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेच पण यामध्ये राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे असे रामदास आठवले म्हणाले.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले बारामती दौऱ्यावर आहेत. या वेळेत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर भागांमध्ये पावसामुळे अतोनात नुकसान झालंय. मानवी वस्तीसह शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
Read Also :
ठाकरे सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे? निलेश राणेंचा सवालhttps://t.co/YVjvG0V91Z @meNeeleshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 22, 2020