सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतोय. देवेंद्र फडणवीस बिहारला जातात त्यांनी दिल्लीला जावं पंतप्रधान घराबाहेर पडतील.
केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. ते देशाचं सरकार आहे. विरोधक केवळ पक्षाचा विचार करत असतील, केंद्रातील सरकार देशाचं आहे. त्यांनी पक्षपात न करता मदत करणं अवश्यक आहे. मोदींनीही फोन करून मदतीचं आश्वासन दिलं,. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे, अस ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरसाठी रवाना झाले. मुंबईवरुन त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूलमंत्री थोरात हे विमानाने सोलापूरला पोहोचले. तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला गेले. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read Also :
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल https://t.co/TLWVdovKso @RajThackeray @mnsadhikrut
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020