काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलवण्यात आली.मात्र ही बैठक खूपच वादळी ठरल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधींसह इतर बड्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांना फटकारल्याचे जमते.
राहुल गांधी यांनी त्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांना फटकारलं व भाजपासोबत संगनमत केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरुन सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले ? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस कार्यकारी समितीमध्ये असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी ते पत्र वाचून दाखवले. मिळालेल्या माहितीनुसार आझाद यांनी पत्राचा बचाव केला. भाजपा बरोबर संगनमत केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईन असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
Also Read This
मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा ! सोनिया गांधी यांची पक्ष कार्यकारणीकडे मागणीhttps://t.co/ZVImJ2CZGe
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 24, 2020