शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना फळ, भाजीपाला इत्यादी पुरवण्यासाठी ‘शेतकरी पार्सल रेल्वे’ उद्यापासून सुरु करण्यात येणार असून पहिली रेल्वे नाशिकहून रवाना होणार आहे . याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणारअसून त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल ,कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांचे खा.डॉ.भारती पवार यांनी आभार मानले आहेत.
विशेष शेतकरी गाडी नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर स्थानकांवर थांबेल. या दृष्टीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकऱ्यांना थेट पहिल्या रेल्वेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता, रेल्वेचे स्टॉप सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
मार्च मध्ये जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे साठी भरीव निधी उपलब्ध केला होता त्यापार्शवभूमीवर हि विशेष रेल्वे उद्यापासून सुरु होणार आहे उद्या सकाळी 11 वाजेपासून धावेल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत .
दरम्यान या पूर्वीही केंद्रसरकारने हॉर्टिकल्चर ट्रेन, कांदा निर्यात सुलभ व जलद व्हावी म्हणून रेल्वे वॅगन वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे. व्हिडीओ कॉंफेरन्सिंग द्वारे हा कार्यक्रम होणार असून दिल्लीच्या रेल्वे कार्यालयातूनच किसान रेल्वेला हिरवा सिग्नल ऑनलाईन च्या माध्यमातून दाखवणार असल्याचे खा डॉ भारती पवारांनी सांगितले आहे.