मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाज उठविल्यावर आता मनसेनेही बॅालीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात उडी घेतली आहे. “बॉलीवूडला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे,” असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज केला आहे.अमेय खोपकर यांनी याबाबत टि्वट केले आहे. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अॅगलबाबत मनसेकडून प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अमेय खोपकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे.
अमेय खोपकर म्हणाले की यापूर्वीही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचे घटना झाल्या आहेत. काहीना शिक्षा देखील झाल्या. मात्र, कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. सुशांतसिंह प्रकरणात तर संपूर्ण फिल्मसिटीचं मुंबईबाहेर हलविण्याचा कुटील डाव रचला जात आहे.
याबाबत काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की काही दिवसांपासून काही ठराविक व्यक्तींकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत.
भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 16, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 16, 2020
Read Also
मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि…https://t.co/s0A5YZh3nR#Shivsena #BJP #Uddhavthackarey #Adityathackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020