मुंबई : राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सरकारवर निशाणा साधला.कोरोनाबाबत सरकारचा घेत असलेले निर्णय तसेच शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.
महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे ?,असा सवाल फडणवीस यांनी केला.बाकी ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा.मुख्यमंत्र्यांनी मुंबई उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पहायचे मग महाराष्ट्र कोणी पहायचा ? मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का ?,” असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला.
खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत. गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Read Also
*. . तर आम्ही घरी जातो, देवेंद्र फडणवीस भडकले*https://t.co/vwEFLJM5yA@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 8, 2020