मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज चांगलाच वादळी ठरला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कामकाजाच्या सुरुवातीलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृगहात गोंधळ घातला होता. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.
“चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
“जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसंच ३ वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेचे आमदार एकामागून एक विषय काढत आहेत. मग आता चर्चा ५ वाजता करा. करोना, शेतकऱ्यांचे असे महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल ? त्यामुळे ३ वाजल्यानंतर चर्चा केली पाहिजे. आता आपण ही चर्चा केली तर ३ वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागणार आहे,” असं फडणवीस म्हणाले. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
कोरोना भ्रष्टाचाराबाबत सवाल
कोरोनाच्या नावाखाली अनेकांनी भ्रष्टाचार केला आहे. ऑक्सिजनचा देखील काळाबाजार सुरु आहे. वाढीव बिलामुळे जनता हैराण झाली आहे कोणाच्या नातेवाईकांना कामे दिलीत आणि कोण कसली कामे करताय याची पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे ज्यांनी कोरोनाचा भष्ट्राचार केला आहे त्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.