नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे आज सकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. जगमोहन जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल असण्यासोबतच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील भुषवले होते.
जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी 1984-89 आणि जानेवारी-मे 1990 अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते.
ते दिल्ली व गोव्याचे उपराज्यपाल देखील काही काळ होते, तसेच लोकसभेवर देखील निवडून गेले होते. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली होती.
Jagmohan Ji’s demise is a monumental loss for our nation. He was an exemplary administrator and a renowned scholar. He always worked towards the betterment of India. His ministerial tenure was marked by innovative policy making. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2021
जनमोहन यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगमोहनजींचे निधन हे देशाचे खुप मोठे नुकसान आहे. ते एक उत्तम प्रशाक आणि स्कॉलर होते. त्यांनी नेहमीच देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ देखील उल्लेखनीय होता. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती, अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केल्या.