नागपूर : एकीकडे मराठा समाजाची आंदोलने सुरू असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघ आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर थाळ्या वाजवून ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन आता आमदार आणि खासदारांच्या घरासमोर करण्यात येणार आहे.
ओबीसी समाज एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के आहे. त्यांना संविधानाच्या कलम १४० नुसार जे अधिकार, न्याय मिळायला पाहिजे होते, ते अद्यापही मिळालेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले, सद्यःस्थितीत ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण ही बाब ओबीसी समाजाला अजिबात मान्य नाही. मराठा समाजाचा समावेश ओबीसींच्या आरक्षणामध्ये करू नये, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
काय म्हणालेत बबनराव तायवाडे नेमकं यावेळी
महत्वाची मागणी म्हणजे सन २०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्र सरकार करत नसेल, तर राज्य सरकारने करावी. ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला आमचा विरोध आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करण्यात येऊ नये, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. मराठा आरक्षणाकडे ज्या गांभीर्याने सरकार बघत आहे, तेवढेच गांभीर्य सरकारला ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात घ्यावे लागेल. अन्यथा आज येथे झालेले आंदोलन राज्यभर तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
Read Also
पक्या परत ओकला त्याची राजघराण्याबद्दल बोलायइतकी लायकी नाही: भाजप नेते निलेश राणेhttps://t.co/aYL0wEoNo8 @meNeeleshNRane @Prksh_Ambedkar @sachin_inc @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020