राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे राम मंदिर ट्रस्टने जाहीर केले. यापार्श्वभूमीवर राज्यात निमंत्रणावरून वादंग पेटले होते
राम मंदिराचं भूमिपूजन सोहळयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमंत्रण काही मिळाले नाही. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमीपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही. त्यांना जरी आमंत्रण मिळालं असतं तरी त्यांची फजिती झाली असती, असं बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर नाराज झाली असती , असा टोला महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे