कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप नेत्यांकडून निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे.
Had heard of college BYOB parties
@BJP having a BYOS (Bring Your Own Security) party everyday in Bengal – CRPF, CISF & every central force imaginable accompanies each two-bit leader who visits
Shame they can’t protect you from staged “attacks”
— Mahua Moitra (@MahuaMoitra) December 11, 2020
नड्डांवरील हल्ला त्यांनी स्वतःच रचला असल्याचा दावा, मोईत्रा यांनी ट्विट करत केला आहे. महुआ मोईत्रा म्हणाल्या की, महाविद्यालयांच्या BYOB (ब्रिंग युअर ओन बॉटल) बद्दल ऐकलं होतं… भाजपा नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज BYOS (ब्रिंग युअर ओन सिक्युरिटी) सोबत दाखल होतात.
राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपाचा कोणीही नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद, ‘बनावट’ हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत, असा दावा मोईत्रा यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांकडून निषेध नोंदवला जात असून, भाजप आमदार राम कदम यांनी थेट पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.