मुंबई : हाथरस प्रकरणात पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटमुळे देशात पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचे दिसून आले.सर्वच स्तरावरून या घटनेचा निषेद व्यक्त होताना पहायला मिळत आहे.
या प्रकरणात मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या घटनेवर त्या म्हणाल्या की, पीडित तरुणीवर ज्यांनी अत्याचार केला, त्या प्रत्येक नराधमाला सात दिवसांच्या आत राजधानी दिल्लीतल्या ‘इंडिया गेट’समोरच्या चौकात फाशी द्या. त्या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना दगडं मारण्याची परवानगी महिलांना द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
कळू दे या देशातल्या सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना, जात-धर्मापेक्षा एका महिलेच्या इज्जतीला या देशाचा कायदा अधिक महत्व देतो ते अस देखील शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. हाथरस बलात्काराने अनेकांच्या मनात चीड आणली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात त्यांनी बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी शरिरय कायदा असायला हवाच अस मत व्यक्त करताना दिसत आहेत.
Read Also
“सोनिया गांधींच्या ताटाखालचं मांजर असल्याचं ‘त्यांनी’ पुन्हा सिद्ध केलं”https://t.co/FOJneEC5tt#SoniaGandhi #cmuddhavthackarey #mahavikasaaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020