मुंबई : विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटल या कोविड रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमुळे 13 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची घटना ताजी असतानाच, आता ही घटना समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोविड मृत्यूचे तांडव सुरू आहे
विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारनी कोविड रुग्णां साठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी
तज्ञांद्वारे कोवीड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे pic.twitter.com/C9ZoWanUqJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 23, 2021
दरम्यान, राज्यात कोरोनारुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे. अशात वेगवेगळ्या घटनांमुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात कोविड मृत्यूचे तांडव सुरू आहे. विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारनी कोविड रुग्णांसाठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी. तज्ञांद्वारे कोविड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.