नागपूर : कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सध्या शहरांसोबत ग्रामीण भागात देखील कोरोना झपाट्याने वाढत आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याची कबुली देतानाच या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राजेश टोपे आज आणि उद्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत.
कोरोनाची तीव्र लक्षणे नसलेल्यांना आता रुग्णालयात येण्याची गरज नाही. आता होम क्वॉरंटाइन होण्यावर भर द्यावा लागेल. ज्या ठिकाणी टेस्टिंग कमी झाल्या तिथे प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे त्या ठिकाणी टेस्टिंगवर भर देण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही भर देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि भंडाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये RTPCR च्या चाचण्या वाढवण्याची गरज असून या चाचण्या वाढवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
राज्य सरकारकडून विदर्भाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. विदर्भाकडे सरकारचं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही. विदर्भातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दर आठवड्याला बैठका घेण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. विदर्भातील कोरोना मृत्यूचा दर कमी करणे, आयसीयू बेडची संख्या वाढवणे, ऑक्सिजनची संख्या वाढवणे आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यावर आमचा सर्वाधिक भर असेल, असंही ते म्हणाले.
Read Also
निलेश राणे भाजपचे आऊटडेटेड नेते त्यांना कवडीचीही किंमत नाही-शिवसेनाhttps://t.co/kBMCIqNls1#NileshRane #CMuddhavthackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020