नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सुरुवातीला या मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपली स्वतःची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजपने देखील दावा ठोकला होता. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारीवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. अशातच आज मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे शिंदे गटातील काही नेत्यांच्या भेटी घेतल्या.
त्यानंतर आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून नवा उमेदवार निश्चित झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या उमेदवाराची उद्या महायुतीकडून घोषणा होण्याची दाट शक्यता असून याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर ठाकरे गटात असलेले विजय करंजकर हे नाराज असल्याचे दिसून आले. याच दरम्यान विजय करंजकर ठाकरे गटातच बंडखोरी करणार असं बोललं जात होतं. त्यातच विजयी करंजकर यांना उद्धव ठाकरे यांनी देखील दोन ते तीन फोन केलं होतं. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. अशातच आज विजय करंजकर यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीकडून विजयी करंजकर यांना लोकसभा निवडणुकीच तिकीट देण्याचा निश्चित झालाय. या संदर्भात उद्या करंजकर यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट , भाजप आणि शिंदे गटातील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विजय करंजकर यांच्या नावावर यांना पाठिंबा आपला जाहीर केला असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, सुरुवातीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत मोठा गोंधळ बघायला मिळाला. हेमंत गोडसे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी भाजपकडून दिनकर पाटील देखील निवडणूक लढवण्यावर लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यासोबतच राष्ट्रवादी कडून छगन भुजबळ यांचे नाव देखील चर्चा झाले. भुजबळ आणि निवडणूक लढवण्यासाठी आपली इच्छा पण व्यक्त केली होती. मात्र काही दिवसानंतर भुजबळ आणि या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर हेमंत गोडसे यांना आपली उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता त्या ठिकाणी विजय करंजकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीत कडून विजय करंजकर यांना उमेदवारी दिली तर त्यांचा सामना हा महाविकास आघाडीतील राजाभाऊ वाजे यांच्यासोबत होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही नेते कट्टर शिवसैनिक असून यांच्यामध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी अजून अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात राजेभाऊ वाजे, विजय करंजकर आणि शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिला