मुंबई : नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना एक दमडी पण नाही. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधी कमी करुन टाकली निसर्ग वादळाचे नुकसान भरपाई चे पैसे ही दिले नाही आता तर जाहिर केलेले प्रकल्प पण दूसरी कडे हलवत आहेत. किती सहन करायच आम्ही, सरकार आहे की जिवंत लाश ? अशी बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून टीका केली आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना एक दमडी पण नाही..
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन ची निधी कमी करुन टाकली..
निसर्ग वादळाचे नुकसान भरपाई चे पैसे ही दिले नाही..
आता तर जाहिर केलेले प्रकल्प पण दूसरी कडे हलवत आहेत..किती सहन करायच आम्ही ???
सरकार आहे की जिवंत लाश ??— nitesh rane (@NiteshNRane) October 7, 2020
मागील काही दिवसांपासून राज्य सरकार कोकणाचे प्रश्न सोडवन्यात सातत्याने अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. कोकणात वादळ आले होते त्या वादळात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. त्यासाठी सरकारने मदतीची घोषणा ही केली पण प्रत्यक्षात मदत पोहचली नाही असा आरोप विरोधकांचा आहे.
स्वातंत्र्यानंतर कोकणात फक्त 1.5 टक्के सिंचन झाले असून पश्चिम महाराष्ट्रात 50 टक्के सिंचन झाले आहे. कोकण सुजलाम सुफलाम करण्यासाठी कोकणातील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही. मात्र कोकणच्या हक्काचे असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त 10 टी.एम.सी. कोकणाला देऊन 57.5 टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट सुरू आहे, ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली होती.
नानारमुळे शेतीयुक्त जमीन जाईल यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला होता आणि शिवसेनेचीही तीच भूमिका होती,कारण कोंकणात शिवसेनेचा मोठा जनाधार आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पास विरोध केला होता.आता येऊन शिवसेना आणि भाजप यांच्यात वादंग होण्याची शक्यता आहे.
Read Also :
एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावं आपण मिळून महाराष्ट्रात सरकार आणू: आठवलेhttps://t.co/PYS7UQQeXh @RamdasAthawale @EknathKhadseBJP @BhatkhalkarA @sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020