बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अशा संकटकाळी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं वक्तव्य आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबूकवरून एक पोस्ट शेयर करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
परतीच्या पावसाने झालेले नुकसान व सुरु असलेल्या पंचनाम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणीबाबत माहिती जाणून घेतली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे व नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी मा. उपविभागीय अधिकारी श्री. नामदेव टिळेकर साहेब, मा. तहसीलदार निळे साहेब, मा. तालुकाकृषी अधिकारी, मा. गटविकास अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकरी बांधव यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानी ची बांधावर जाऊन आढावा घेतला.
शेतकरी बांधवांची अडचण होऊ नये, त्यांना गाव पातळीवर अर्ज जमा करण्यात यावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गावा गावात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाना बाबत लवकरच बीडच्या तहसील कार्यालयात कृषी विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल.
Read Also :
‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं आज राज्यभरात जोरदार मोर्चेhttps://t.co/TR4xETbZyX @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020