मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करत असताना मी समृद्ध तर गाव समृद्ध हि संकल्पना लोकचळवळ व लोकव्यापी व्हायला हवी असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यात ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मी समृद्ध तर गाव समृद्ध या बाबतचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठकीत मंत्री ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं आहे.
मेळघाटातील बांबू लागवडीतून मोठे उत्पन्न मिळवणाऱ्या राहू गावाच अभिनंदन करून मंत्री ठाकूर म्हणाल्या कि एक गाव अशा पद्धतीने आपण विकास करू शकत असतील तर इतर गावेही आपलं अनुकरण करून स्वतः सक्षम होऊ शकतील. सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांबाबत योग्य ते मार्गदर्शन करावं असही त्यांनी सांगितलं आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे असाही त्यांनी नमूद केलं आहे,कारण या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे, असाही त्या म्हणाल्या.
दरम्यान काही दिवसांपूर्वी महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यशोमती ठाकूर यांची ही मागणी अवघ्या 3 दिवसात मान्य झाली असून, 21 सप्टेंबरपासून या बस सुरू आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी माहिती दिली की, सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील.
Read Also :
'या' कारणासाठी भल्या पहाटेच अजित पवार करतात महापौरांना फोनhttps://t.co/b8UwksKU5M#AjitPawar #MurlidharMohol #NCP #PuneCorporation @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 14, 2020