मुंबई : राज्यांतील बिगर भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सकारकडून सुरु आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच असं खुलं आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांना दिलं आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यात माध्यमांशी बोलत होते.
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील सरकारे पाडण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. केंद्र सरकार राज्यातील सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातही तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आमचं सरकार भक्कम असून ते त्यांनी पाडून दाखवावंच. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपला दिलेल्या आव्हानाचाही यावेळी त्यांनी पुनरूच्चार केला.
दरम्यान आज मोदींच्या नावावर ५६ आमदार निवडून आणले हिम्मत असेल तर स्वतः च्या नावावर निवडून दाखव, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त १० ते १५ आमदार निवडून येतील असा हल्ला भाजप खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलम ३७० बद्दल बोलतात पण त्यांना कायदा तरी कळतो का? मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 ही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
Read Also :
उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी गत भाजपची झालीये, सचिन सावंतांचा आरोपhttps://t.co/H4gOfiaZ8K @sachin_inc @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020