मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्व काही आलबेल होईल असं चित्र होतं. परंतु आता निकालानंतरही महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. लोकसभाप्रमाणेच राज्यसभेतही डावलल्यानंतर छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय.
हेही वाचा..“बारामतीत झालेल्या पराभावासाठी मला चिंतन करण्याची काहीही गरज नाही”
विजय वडेट्टीवार म्हणाले की, छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलेले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात त्यांना जे मिळते ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. राज्यातील सरकार कमिशन खोर सरकार झालेय. त्यांनी खरेदीचा सपाटा लावलाय. छगन भुजबळ साहेबांची अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. ते खासगीरित्या बोलले होते. आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत.
हेही वाचा…अजित पवारांच्या अडचणी वाढल्या? अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान
पुढे बोलतांना ते म्हणाले की, तु मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे करण्यात काहीच अर्थ नाही. आता एक तुकडा दोन घाव त्यांनी करावे. त्यांच्याकडून आम्हाला ती अपेक्षा आहे. अंगावर आले म्हणून शिंगावर घेणार व्यक्ती ते आहे. परंतु आता कुरकुर करतात. ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही. असंही ते म्हणाले. तसेज भुजबळ दबावामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. तेच नाही तर अनेक जण असे म्हणतात.
दरम्यान, भुजबळ तर शेवटच्या टप्प्यात गेले. त्यांची इच्छा नव्हती. परंतु तपास संस्थांच्या दबाव आणून अनेकांना नेण्यात आले. आता भुजबळांनी तेथेच राहावे. अजित पवार यांनी तेथेच भाजपसोबत राहावे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडून सत्ता काढून आम्हाला देईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…गजा मारणे अन् निलेश लंके भेट, अजित पवार गटाने डिवचलं, म्हणाले..
हेही वाचा..एनडीए आघाडीमध्ये लवकरच भूकंप होणार ? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत