मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकाने लवकरात लवकर मंदिर उघडावीत म्हणून यासाठी भाजप आणि त्यांच्या समर्थित संघटनांनी आंदोलने आणि मोर्चे काढलेले आहेत. यावरून अशा या आंदोलनाला एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांनीसुद्धा भाजपला साथ दिला होती.
भाजपने घंटानाद आणि प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन आंदोलन केले होते. पण आता हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे कारण मुंबईचे पालकमंत्री काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी विश्व हिंदू परिषदेवर टीका केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज एका मोर्चाचं आयोजन केले आहे. आजच्या घडीला धार्मिक स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का..? असा सवाल विहिंपला असल्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्र अस्लम शेख यांनी म्हटले आहे. सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन बाळगायचं आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत, हे पाहायला मिळंत, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपनं राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी अस्लम शेख यांनी भाजपनं अगोदर त्यांची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना धार्मिक स्थळ उघडण्याचा सल्ला द्यावा, असे सुचवले होते. दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून धार्मिक स्थळं उघडण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले.
Read Also :
“आमदार लांडगे यांची राजकीय कारकीर्द नवोदितांसाठी आदर्श!”; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन https://t.co/hLbnNTCWe6 @MLAMaheshLandge @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020