दिल्ली : हाथरस प्रकरण संपल्यानंतर राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान मोदींना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. रिकाम्या बोगद्यात हात मोदी कुणाला अभिवादन करत होते असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला असता त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. हरयाणामधल्या सभेत ते बोलत होते. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं' इति राहुल गांधी
'दोन आण्याची भांग घेतली तर कितीही भारी कल्पना सुचू शकतात', असे लो. टिळक एका अग्रलेखात म्हणाले होते.
नेहरूंपासून चीन कडून मार खाण्याचा इतिहास असताना राहुलना असे सुचते त्याचे उत्तर टिळकांनी दिलेले आहे. pic.twitter.com/qE73U8dkbS
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 7, 2020
“आमचं सरकार असतं तर चिनी सैन्याला १५ मिनिटात बाहेर काढलं असतं, इति राहुल गांधी. ‘दोन आण्याची भांग घेतली तर कितीही भारी कल्पना सुचू शकतात’, असे लोकमान्य टिळक एका अग्रलेखात म्हणाले होते. नेहरूंपासून चीन कडून मार खाण्याचा इतिहास असताना राहुल गांधींना असं सुचतं त्याचं उत्तर टिळकांनी दिलेलं आहे,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून राहुल गांधींना टोला लगावला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची ताकद, शेतकऱ्याची ताकद, मजुराची ताकद समजत नाही,” असंही त्यांनी म्हटलं होतं.
Read Also :
… म्हणून उदयनराजे मराठा आरक्षणाच्या बैठकीला आले नाहीत ! विनायक मेटे यांचा गौप्यस्फोटhttps://t.co/BSjD9Cgpez#MarathaReservation #VinayakMete #ChhatrapatiUdayanraje@Vinayakmete @Chh_Udayanraje
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020