मुंबई : भाजपने राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. ठाण्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर नागपूरमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच राज्यात तात्काळ दिशा कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
आशिष शेलार यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निवेदन दिलं. ते म्हणाले, “राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात भाजपने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढला आहे. ठाण्याच्या आंदोलनात मी आज सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आज @BJP4Maharashtra ने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात काढलेल्या आक्रोश मोर्चातील एक आक्रोश मोर्चा आम्ही मुंबईत शिवाजी पार्क येथे काढला… अत्याचार झालेल्या महिलांचा आक्रोश ऐकू न जाणाऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. pic.twitter.com/2jr27DPVKk
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 12, 2020
नवाब मलिक यांनी भाजपच्या आंदोलनांवर निशाणा साधत भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, भाजपनं त्यांच्या राज्यात असलेल्या प्रश्नावर आंदोलन करावं. भाजपनं त्यांच्या कार्यकाळात काय केलं तेही पाहावं. या सरकारविरोधात बोलायला विषय नाही म्हणून भाजप आंदोलन करत आहे, पण त्यांना आंदोलन करण्याचाही नैतिक अधिकार नाही.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपच्यावतीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनास भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपा पुणे शहर यांच्यावतीने प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil, महिला भाजपा प्रदेशाध्यक्ष @KhapreU तसेच @jagdishmulikbjp यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले.(1/4)#SaveMaharashtraFromMVA pic.twitter.com/iURe2MUS3e
— BJP Pune (@BJP4PuneCity) October 12, 2020
यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उत्तरपरदेशातील हाथरसच्या घटनेचाही यावेळी निषेध करण्यात आला. तसेच आघाडी सरकार हाथरसच्या घटनेचा निषेध करताना राजकारण करत असून राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
Read Also :
महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ! कोरोनामुळे शिवसेनेचा 'हा' नेता लीलावती रुग्णालयात दाखल https://t.co/FsL23pdXZr#Shivsena #MahavikasAaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020