दिल्ली : कोरोना विषाणूने भारतात मोठा कहर केल्यानंतर आता जग आणि विशेषतः भारत ज्याची वाट पाहत आहे, आता अशी आनंदाची बातमी आता आलेली आहे. मोदी सरकारने सिरम इंस्टीट्यूटच्या कोविशिल्ड लसीला वापरण्याकरिता संपूर्ण चाचण्या पुर्ण केल्यानंतर परवानगी दिली आहे. आता लवकरात लवकर ती भारतीयांना कशी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे!
भारतात साधारणतः मार्चमध्ये कोरोना विषाणूमुळे टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने ती वाढवत नेण्यात आली या दरम्यान देशातील छोटे मोठे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले होते. पण आता या आनंदाच्या बातमीमुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद,पुणे आणि अहमदाबाद याठिकाणी येऊन लस कंपन्यांना भेटून नेमकी लस कशी तयार होत आहे याविषयीची माहिती घेतली होती. दरम्यान सर्वात पहिली लस सिरम इंस्टीट्यूट ची येईल अशी अपेक्षा अदर पुनावाला यांनी व्यक्त केली होती ती आज सार्थ ठरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Read Also :
ठाकरे सरकारची लगबग : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव सादर
पत्नी गौरी गडाख यांच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाख यांना कोणाचा आधार?
औरंगाबादेत साखर सहसंचालकांविरोधात दारूची बाटली, मटण देऊन अनोखं आंदोलन
औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे – फडणवीस
‘आता CBI सगळ्यांना पवित्र करेल’, ‘या’ भाजपा नेत्याचं भर कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य
नववर्षात कन्ट्रोल रूमला आलेल्या पहिल्या फोन कॉलला थेट गृहमंत्र्याचे उत्तर!
विचार करा करोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर…
‘संभाजीनगर’चा वापर केवळ निवडणुकीपुरता’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा