अहमदनगर: महाराष्ट्रातील श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. साखर सम्राटांचा तालुका अशी श्रीगोंदा तालुक्याची ओळख आहे. मागील विधानसभेत मोदी लाटेमुळे ऐन वेळी माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीत माघार घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूट वर गेला. असे असतानाही राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार यांच्या गळ्यात अजित दादा पवार यांनी उमेदवारी टाकली आणि त्यांना मोठी रसद देखील पुरवली. त्यांचा आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात अत्यंत थोड्या मताने पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीनंतर श्रीगोंद्यामधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. Rahul Jagtap is EX-MLA from Shrigonda Maharashtra He belongs to Nationalist Congress Party
राहुल जगताप Rahul Jagtap हे जिल्हा बँकेचे संचालक झालेले आहेत. नुकताच राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार GHANSHAM SHELAR यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून, ती पक्षातील नेते व मतदार पूर्ण करतील, अशी भूमिका मांडली होती. पुढचा विधानसभेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तेच असणार असंच काहीतरी त्यांना सुचवायचं होत. परंतु राहुल जगताप यांनी मात्र आगामी विधानसभेच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण असं वक्तव्य केले आहे. घनश्याम शेलार हे आमचे नेते आहे. त्यांच्या साठी आम्ही जीवाची बाजी लावली आणि त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला. त्यांनी जरी आगामी विधानसभेच्या बाबतीत वक्तव्य केले असेल तरी देखील पक्षाकडून जो आदेश येईल तोच आम्ही मानणार आहोत.
आगामी विधानसभेत काय भूमिका राहील? या प्रश्नावर जगताप Rahul Jagtap म्हणाले, की या राजकीय चर्चेला सध्या अर्थ नाही. मात्र विधानसभा लढायची हा नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून मी त्यादृष्टीने कामाला सुरवात करणार आहे. कुकडी आणि घोड नदी प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी या प्रश्नावर भाजपच्या आमदारांनी तालुका वाऱ्यावर सोडले आहे. आम्हाला कुठले राजकारण करायचे नसले, तरी आमदार नेमके कुठे आहेत? लोकांना त्यांनी वाऱ्यावर का सोडले, हे विचारण्याचा अधिकार विरोधक म्हणून नक्कीच आहे.