मुंबई : मोदींच्या नावावर ५६ आमदार निवडून आणले हिम्मत असेल तर स्वतः च्या नावावर निवडून दाखव, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त १० ते १५ आमदार निवडून येतील असा हल्ला भाजप खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.
माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची आब राखली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलम ३७० बद्दल बोलतात पण त्यांना कायदा तरी कळतो का? मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 ही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेने काय केलं, मराठ्यांना फक्त फसवण्याच काम मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत, धनगरांना आरक्षण कधी देणार आहेत? उद्धव ठाकरे हा मराठ्यांचा द्वेष करणारा माणूस असून त्याने समाजाची नुसती फसवणूक करण्याचं काम लावलंय अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी दादागिरीची भाषा करु नये, गांडूळाची भाषा करतो, काय मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी त्याने काय केलय? आधी बेळगाव कारवार बद्दल बोल नंतर ३७० विषयी बोल अरे अधिकारी हस्तायत तुम्हाला तुम्ही बुद्धू मुख्यमंत्री आहे. कालच भाषणही द्वेषाने भरलेलं होत. अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. निर्बुद्ध आणि बेजाबदार विधान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हिंदुत्वाशी बेईमानी करून सत्ता मिळवली आणि आता हिंदुत्वाच्या गप्पा मारतायत खर तर शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे हे पुच्छट माणूस असून त्यांची नेत्रुत्व करण्याची लायकि नाही म्हणूनच त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी नव्या जबाबदाऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी नेहमी बाळासाहेब ठाकरेंना छळलंय, सातत्याने अपमान केला आणि तो माणूस आज आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना भवनासमोर गडकरी चौकात दशहरा मेळावा घ्यावा अशी इच्छा बाळासाहेबांची होती पण उद्धवने ऐकलं नाही. वडिलांचं एकल नाही, शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली आम्ही केसेस अंगावर घेतल्या आता हा उद्धव ठाकरे कोण? हा कसला मुख्यमंत्री आहे? मी निषेध करतो अशा गोष्टींचा असा हल्ला नारायण राणेंनी केला आहे.
Read Also :
उद्धव ठाकरेला कायदा तरी माहिती आहे का? : नारायण राणे https://t.co/4GQiCeRysl @MeNarayanRane @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020