मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरून वाढवून 60 करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. आता यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबतची मागणी केली आहे.
सरकारने ही मागणी मान्य केल्यास अधिकच्या 2 वर्षांसाठीचे निवृत्ती लाभापोटीचे शासनाचे 28 हजार कोटी रुपये वाचतील आणि ती रक्कम राज्याच्या विकासासाठी वापरता येईल, असे महासंघाने म्हटले आहे.
सध्या फक्त गड ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे. सध्या देशातील 22 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे.