महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपात असते, असा दावा करणाऱ्या भाजप नेते नारायण राणे यांना जयंत पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. मी भाजपच्या कोणत्या नेत्याशी याबाबत चर्चा केली याची माहिती द्यावी, असे आव्हानच जयंत पाटलांनी नारायण राणेंना दिले.
जयंत पाटील यांनी राणेंचा हा दावा फेटाळून लावला असून भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राणे साहेबांची @BJP4Maharashtra च्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.@MeNarayanRane
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 30, 2020
जयंत पाटील यांनी ट्विट केले की, राणे साहेबांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.
भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असेही ते म्हणाले.
दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 30, 2020
दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.
दरम्यान, जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती, असा दावा नारायण राणेंनी केला होता.