प्रतिनिधी: विवेक पानमंद
पंढरपूर: पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा आज रांजणी, पंढरपूर येथे शुभारंभ करण्यात आला. भगीरथ यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ मेहनत घेत आहे . मला खात्री आहे की रात्रीचा दिवस करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विजय मिळवेल. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहे. या मतदारसंघातही आम्ही एकदिलाने लढतो आहे . भगिरथचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्र सरकार कसे अडचणीत येईल यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढलं असतं मात्र तपास ‘एनआयए’कडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का असा प्रश्न आता पडतोय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील. सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे मंगळवेढ्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण सरकार भगीरथच्या मागे उभे राहणार आणि मंगळवेढ्याच्या विकासात तसूभर गोष्टीही कमी पडू देणार नाही. आज राज्यावर कोरोनाच संकट आहे, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही तिघेही एकदिलाने या संकटाचा सामना करत आहे.
या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला आहे. मात्र, भालके विरोधी पक्षाचे आमदार होते तेव्हा भाजप सरकारने या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ३५ गावांचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघातील इतर प्रश्न असतील भालके यांनी प्रत्येक वेळी भाजपशी संघर्ष केला. आपले सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांगलादेश स्वातंत्र्याचं संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचं आहे, तिथेही आपण बांगलादेश स्वतंत्र लढ्यात होतं असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत , शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला त्यावर बोलण्यास वेळ नाही.