अजित पवार आज मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर निघून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ” तीन तास अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीत बसलेत, हे तुम्ही पाहिलं नाही आणि ते दहा मिनिटं आधी गेलेत त्याच्या तुम्ही बातम्या केल्यात, असे वक्तव्य आव्हाडांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांना एका वृत्तवाहिनीने अजित पवार आज मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर निघून गेलेत, असाही प्रश्न विचारला गेला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. कोविडचा प्रश्न आहे, सगळं संपत आलंय, कोविडचे शेवटचे दोन प्रश्न उरले होते, त्यांना कदाचित पुण्याला जायचं असेल म्हणून ते लवकर गेलेत. तीन तास अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीत बसलेत, हे तुम्ही पाहिलं नाही आणि ते दहा मिनिटं आधी गेलेत त्याच्या तुम्ही बातम्या केल्यात, असे आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुरवातीलाच आव्हाड यांना सरकारबद्दल विचारणा करण्यात आली. यावर आव्हाडांनीनारायण राणेंवर टीका केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड म्हणालेत की, मला माहित नाही राणे पत्रिका पाहतात, हात पाहतात का त्यांना काही ज्ञान प्राप्त आहे, हे मला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत म्हाडाच्या बाबतीत मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. कधी मालक, कधी टेन्ट्स, NOC घेऊन डेव्हलपमेंट थांबून राहणे , प्रकल्प पुढे ढकलला जाणे असे प्रकार समोर येतात. आजच्या निर्णयाने अशा बाबींमध्ये अडकून पडलेल्या १४ हजार सेस बिल्डींग्सबाबत आता काम मार्गी लागेल. आता या गोष्टी सरकारने हातात घेतल्या आहेत. यानंतर आता डेव्हलपमेंट होऊ शकणार आहे.