मुंबई : आरे जंगलासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं.
काय म्हणालेत आव्हाड नेमकं आपल्या ट्विटमध्ये
“मित्रहो….. आम्ही दिलेला शब्द जपला….
आरेचे जंगल वाचावं यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली, तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला.
अभिनंदन आपणा सर्वांचे
#संघर्षाचा विजय असो,”
मित्रहो…..
आम्ही दिलेला शब्द जपला….
आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली
तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही
परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला
अभिनंदन आपणा सर्वांचे#संघर्षाचा विजय असो pic.twitter.com/rZMD1NjqrK— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020