मुंबई : रुग्णवाहिका आणि बेड वेळेत न मिळाल्यामुळे पत्रकार पांडुरंग रायकर (४२) यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना काळात रिपोर्टींग करत असताना पत्रकार रायकर यांचे निधन झाले आहे. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पांडुरंग रायकर यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. दरम्यान, रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल मागवला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. श्रीमंत लोक अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार करत असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत, असा दावाही आरोग्य मंत्र्यांनी केला आहे.
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी आदी माध्यमांमध्ये त्यांनी आपली सेवा दिली होती. राजकारणापासून ते इतर सर्व प्रकारच्या विषयांवर त्यांनी लिखाणही केले. ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्याने, पांडुरंग यांची कोरोनाशी झुंज संपली. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पुण्यात व्हेंटीलेटर उपलब्ध झाला नव्हता. मध्यरात्री पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णवाहिका मिळेपर्यंत उशीर झाला होता.
फेसबूक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कितीही आरोग्य यंत्रणा सक्षम असली असा दावा केला असला तरीही अशा प्रकरणांमुळे एका पत्रकाराला व्हेंटीलेटर, रुग्णवाहिका आणि वेळेत उपचारासाठी बेड मिळणे पुण्यासारख्या शहरात कठीण होत असल्याने हे दावे किती फोल आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
Read Also This
“रायबरेलीत इंदिरा गांधी देखील पडल्या होत्या मात्र दोन पिढ्या आमचं वर्चस्व कायम”; अजित पवार यांचा फोन कॉल व्हायरल https://t.co/kRn5yOy9Ss @AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @INCIndia @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 2, 2020