मुंबई : कंगना राणावत ने मुंबईबाबत विधान केले आणि नेटकाऱ्यानी तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे कंगनाचे विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील कंगना बाबत वक्तव्य केले आहे.
मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटतेय असे कंगनाने विधान केले होते त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या विधानाचा समाचार घेत कंगनाला महाराष्ट्रात तसेच मुंबईत राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचे म्हंटले आहे. माध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे समजते.
कंगनाने केलेल्या वक्त्यांमुळे आता कंगना चांगलीच अडचणीत आल्याचे समजते. तर यापूर्वी कंगणाने मी मुंबईत येत आहे कोणाच्या बापामध्ये हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा अशा प्रकारचे आव्हान शिवसेनेला दिल्याचे दिसून आले होते.
I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
Read Also
ती इथे आली तर आमच्या रणरागिणी थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीतhttps://t.co/k6BOS42XbL@PratapSarnaik @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 4, 2020