मुंबई : मुंबई पोलिसांची भिती वाटते, तसेच मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत वादात अडकली आहे. कंगनाच्या या विधानामुळे तिला मुंबईत परतू नको, असा इशारा अनेकांनी दिला होता. मात्र यावर कंगनाने देखील आपण 9 सप्टेंबरला मुंबई येणार असून, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवावे असे खुले आव्हान केले होते.
कंगना आज मुंबईत दाखल होणार असून, यापुर्वी तिला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. आज मुंबईला येण्यापुर्वी कंगनाने ट्विट केले असून, कोणालाही घाबरणार नाही अथवा झुकणार नाही असे म्हटले आहे.
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगनाने ट्विट केले की, राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.
दरम्यान, आज कंगना मुंबईत दाखल होणार असून, यावर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.