मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. यातच ९ सेप्टेंबरला कंगना रणौत मुंबईत परतणार आहे . त्यामुळे नियमानुसार कंगनाला क्वारंटाईन करणार असल्याची माहित महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
‘येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.’असे किशोरी पेडणेकर म्हणल्या आहेत.
दरम्यान , अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.
Read Also
BMC अधिकारी बळजबरीने माझ्या ऑफिसमध्ये घुसले,कंगनाने पोस्ट केला व्हिडीओhttps://t.co/QyhSQh3dgX@KanganaTeam @mybmc @mybmcWardD
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020