भाजप नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात प्रत्येक घरात संताप आहे. माझा विश्वास आहे की, त्यांना हे समजत असून त्यातील बहुतेक नेते पुन्हा पक्षात परततील.’, असे विधान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
अशोक गहलोत म्हणाले, ‘मी आपणा सर्वांना आवाहन करतो की लोकशाही वाचवण्यासाठी, आमच्यावर लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि चुकीच्या परंपरांपासून वाचण्यासाठी तुम्ही जनतेचा आवाज ऐकावा.’ दरम्यान, विधानसभा अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्यपाल कलराज मिश्र यांनी याची परवानगी दिली आहे.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षविरोधात पुकारलेल्या बंडामुळे राजस्थानचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच पार्श्वभूमीवर ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत त्यापर्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री गहलोत यांनी राजस्थान विधानसभेच्या सर्व आमदारांना पत्र लिहून लोकांच्या हितासाठी सत्यासोबत उभे राहण्याचे आणि लोकशाही वाचविण्याचे आवाहन केले आहे.