जळगाव: सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील हे माझ्या वडिलाप्रमाणे आहेत. त्यांनी माझ काही चुकत असेल तर वेळोवेळी मला मार्गदर्शन करवे. केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. परंतू याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, अश्या शब्दात खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला.
केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.
रक्षा खडसे म्हणतात “मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते. याबाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही. यामध्ये कोणाचेही श्रेय नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल,” “मात्र यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे. ते मला वडिलांसारखे आहेत. उलट मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याने माझे कौतुक करुन प्रोत्साहन देण्याची गरज होती,” असे रक्षा खडसे म्हणाल्या.