श्रीराम मंदिर भुमिपुजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असले पाहिजे असे मतं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्थ आचार्य किशोरजी व्यास म्हणजेच गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंचं नव्हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण गेलं पाहिजे असेही म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरबाबत मोठी भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले.
निमंत्रण कुणाला द्यायचं आणि नाही याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. ज्यांची गरज आहे त्यांनाच बोलावलं जाईल. देशातील मुख्यमंत्र्यांना बोलावण्याबाबत विचार सुरू असल्याचे गोविंद गिरी महाराज म्हणाले
राम मंदिर राष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. राष्ट्राचे मनोबल वाढविण्यासाठी आणि कोरोनाला हरविण्यासाठी हा सगळा उत्सव आहे. अयोध्येतील उत्सव सुरू असतांना घरातच सर्वांनी दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.