अहमदनगर : परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतीच पेरलेली ज्वारी, कांदा, हरभरा,गहू इ. पिके वाहून गेली तर काही ठिकाणी मका, ऊस ही पिके भुसपाट झाली आहेत. कर्जत येथे तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची व तात्काळ पंचनामे करण्याची मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. मातीमोल भावाने शेतकऱ्यांना कष्टाने पिकविलेला शेतीमाल विकावा लागतो आहे. त्यात भर या पावसाची पडली आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. या कामात उशीर झाल्यास शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाही. पंचनाम्याचे मागचे अनुभव चांगले नाहीत.
अन्यथा तीव्र आंदोलन करू
अनेक वेळा नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले असते पण पंचनामा करण्यात वेळ जातो. काही वेळेस पंचनामेच होत नाहीत त्यामुळे नुकसान भरपाई मिळत नाही. या कामात काही अधिकारी, कर्मचारी कामात टाळाटाळ करतात. बेपर्वाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली तरच काहीतरी वचक बसेल. पंचनामे झाले नाहीत तर युवक क्रांती दल शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, सत्याग्रह करणार आहे. वेळ पडली तर जेल मध्ये जाऊ, असा इशारा युक्रांदच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, रवळगावचे अध्यक्ष रवी गोरे, राशीन शहराध्यक्ष विनोद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी देशमुख, सलीम आतार, बबन दळवी, मारुती अनारसे, योगेश लोंढे उपस्थित होते.
Read Also :
काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्याचे. . जे कधी नाही झाले ते सगळ होत आहेhttps://t.co/JDJjmrbYKV#Shivsena #CMUddhavThackarey @NiteshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020