मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना नाहक बदनाम केलं गेले असा आरोप करत आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर एकच हल्लाबोल केला.भाजपचे मंगेश चव्हाण यांनी देखील मिर्झापूर या सिरिझची उपमा देत नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कालीन भैय्याला दोनच चिंता १ मिर्जापूरची सत्ता राखणं आणि दुसरी मुलाची क्षमता नसतानाही ‘मिर्जापूर‘च्या गादीवर बसवून बाहुबली करणं अशा आशयाचे ट्विट करत मंगेश चव्हाण यांनी नाव न घेता सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिर्जापूर नामक सिरीजमध्ये देखील मुलाच्या राजगादीसाठी त्याचे वडील यांनी केलेला अट्टाहास सर्वांनी पाहिलेला आहे. त्याच विषयाचा संदर्भ देते चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यानंतर देखील नारायण राणे आणि पुत्र नितेश व निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पुळचट असा केला होता. तर भाजपकडून आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील ठाकरेंचा समाचार घेण्यात आला होता.
कालीन भैय्याला दोनच चिंता
१. मिर्जापूरची सत्ता राखणं
२. मुलाची क्षमता नसतानाही ‘मिर्जापूर‘च्या गादीवर बसवून बाहुबली करणं.
.#मिर्जापूर_व्हाया_मुंबई— Mangesh Chavan (@mlamangeshbjp) October 26, 2020
Read Also
हे सरकार स्वतःच्या कर्माने पडणार, आशिष शेलार यांची टीका
https://t.co/JmSbv2PURT#AashishShelar #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 27, 2020