मराठा समाजाच्या आरक्षणाचा केंद्र आणि राज्य सरकारकडून चेंडू बनवला असल्याची भावना मराठा समाजात आहे. 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंद ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कोरोना काळात सर्व नियम पाळत हे आंदोलन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे.
‘सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्णविचार याचिका दाखल करून तात्काळ मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा.. अन्यथा उग्र आंदोलन करू. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार नाही, पण सत्ताधारी आणि विरोधकाना नग्न करून मारू,’ असा आक्रमक इशारा असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबद्दल देखील बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे यासाठी अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाकडून व्यक्त होत आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात याबाबत जनजागृती सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा चेंडू सुरू असल्याची भावना आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात 21 सप्टेंबरला बंदचा इशारा दिला देण्यात आला आहे.