मुंबई : मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात यांचे बाप म्हणजे जनसंघ फुटला होता. त्यामुळे मुंबईचे जे काही लचके तोडण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध रहा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, आणि मराठी आमचा प्राण आहे. आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.
अकबरूद्दीन ओवेसी काल औरंगाबाद याठिकाणी ओरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होतो. त्यावर भाजपने टिका केली. मात्र आतापर्यंत भाजपच्या काळात 20 वेळा तो ओरंगजेबाच्या कबरी समोर गेला आहे. ओरंगजेबाला आम्हीच गाडलं आहे. ओंरगजेबाचा जन्म गुजरातमधील दहोद गावात झाला आहे. महाराष्ट्रवर सातत्याने आक्रमन का होताहेत. हे आता तुम्हाला समजलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भोगलं होतं. तेच आम्ही आता भोगत आहोत. असंही ते म्हणालेत.
मी आज सकाळीच सांगितलेलं आजची सभा ही 100 सभांची बाप असेल. ही आजची सभा काय सांगतेय? ही सांगतेय की मुंबईचा बाप फक्त शिवसेना आहे. आणि आमचा बाप एकच आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ही सभा आणखी एक संदेश देतेय की महाराष्ट्र कुणासमोर झुकणार नाहीे. असंही ते म्हणालेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान आणि त्यांनी निर्माण केलेले दहशतवादीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घाबरायचे. म्हणायला कमीपणा वाटत असताना बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा केली. असंही ते म्हणालेत.