मुंबई : आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.
मला देवळात घंटा बडावणारा हिंदुत्व नको आहे तर दहशतवाद्यांना बडवणारं हिंदुत्व पाहिजे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मध्ये बोलले होते. यांचं हिंदुत्व गधादारी आहे. आमचं हिंदुत्व गदाधारी होतं ते आम्ही मध्ये सोडलं.
अकबरूद्दीन ओवेसी काल औरंगाबाद याठिकाणी ओरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होतो. त्यावर भाजपने टिका केली. मात्र आतापर्यंत भाजपच्या काळात 20 वेळा तो ओरंगजेबाच्या कबरी समोर गेला आहे. ओरंगजेबाला आम्हीच गाडलं आहे. ओंरगजेबाचा जन्म गुजरातमधील दहोद गावात झाला आहे. महाराष्ट्रवर सातत्याने आक्रमन का होताहेत. हे आता तुम्हाला समजलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भोगलं होतं. तेच आम्ही आता भोगत आहोत. असंही ते म्हणालेत.
मी आज सकाळीच सांगितलेलं आजची सभा ही 100 सभांची बाप असेल. ही आजची सभा काय सांगतेय? ही सांगतेय की मुंबईचा बाप फक्त शिवसेना आहे. आणि आमचा बाप एकच आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ही सभा आणखी एक संदेश देतेय की महाराष्ट्र कुणासमोर झुकणार नाहीे. असंही ते म्हणालेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान आणि त्यांनी निर्माण केलेले दहशतवादीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घाबरायचे. म्हणायला कमीपणा वाटत असताना बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा केली. असंही ते म्हणालेत.
मी आज इथे येत असताना मला खूप गर्दी दिसली. त्या सर्व जनतेमध्ये मला पंचमुखी हनुमान दिसले, श्रीराम, जानकी व लक्ष्मण दिसले, गणपती बाप्पा दिसले. ही सर्व लोकंच आमची कवचकुंडल आहेत. शिवसैनिकांमध्ये आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिसलेत. शिवसैनिक म्हणजे आमचं कवचकुंडल आहे. कोविड काळात शिवसेनेने खुप काम केलीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करीत आहेत. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तर शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही तर शिवसेना एक विचार आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.