पुणे : उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यांचं सरकार होतं. त्यावेळी भारतातून कारसेवक उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये गेले होते. तेव्हा आपल्यातील सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत मी शरयु नदीमध्ये तरगंताना मी पाहिली होती. त्यामुळे मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. मात्र ज्या कारसेवकांची प्रेत तरंगत होती त्या तिथल्या जागेचं पण मला दर्शन घ्यायचं होतं. असंही ते म्हणाले.
त्यांना आता 14 वर्षानंतर जाग आली आहे. माफी मागण्याचा विषय आहे तर गुजरात मधील अल्पेश ठाकूर म्हणून एक गृहस्थ आहे. 2017 गुजरातमध्ये उत्तर, बिहार मधील एका व्यक्तीकडूून एका महिलेचा बलात्कार झाले. त्यानंतर त्या रात्रीत गुजरातमधून 10 ते 15 हजार लोकांना गुजरात मधून हाकलून देण्यात आलं. ते लोकं मग मुंबईत आले. त्यानंतर ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथून मग कोण माफी मागणार आहेत ? असा सवाल देखील त्यांनी केला.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर मला जर काही झालं असतं तर आपल्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धुमाकुळ घातला असता. पंरतु त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असते. ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी तुमच्यावर गुन्हे दाखल केले असते. त्या निवडणुकांसाठी इकडे कुणीच नसते. हा सर्व सापाळा होता. अयोध्या दौरा स्थगित केला असल्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी आज पुण्यातील सभेच आयोजन केलं आहे. त्यावर काहींना दुख तर काहींना आनंद झाला. त्यासाठीच मधले दोन दिवस दिले होते. पुण्यात अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाला. त्यावर माझा लक्षं होतं. त्याबद्दल मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून माहिती आहे. त्यावरून मला असं समजलं की हा एक प्रकारे सापळा आहे. त्या सापळ्यामध्ये आपण अडकले पाहिजे नाहीत. या गोष्टीसाठी रसद ही महाराष्ट्रातून पोहचली. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपसली होती . त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आराखडा आखला गेला असंही ते म्हणाले.
दरम्यान, सभेसाठी एसपी काॅंलेज त्यानंतर नदीपात्राचं ठिकाण ठरलं होतं. मग आम्हाला नाही तर कुणालाच नाही. मात्र पाऊस कोणत्याही क्षणी पडू शकतो. मग निवडणुका नाही तर कशाला पावसात भिजत बसा. अलिकडेच मी पुण्यात आलो होतो परंतु कमरेला आणि पायाला त्रास होत असल्याने मी पुन्हा मुंबईला गेलो. 1 मे रोजी त्यासाठी शस्त्रक्रिया करायला जाणार आहे. असंही ते म्हणाले.