पुणे : मशिदीवरील भोंग्यांसंबधी भूमिका घेतल्यानंतर अनेकांनी आपले स्टंटबाजी करायला सुरूवात केली. तसेच हनुमान चालिसा म्हणालया मातोश्री मशिद आहे का? असं म्हणत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला चांगलचं सुनावलं. त्यानंतर राणा दाम्पत्याला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. महाराष्ट्रात मोठा राडा झाला. मात्र त्यानंतर लडाग मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवतांना सगळ्यांनी पाहिलं.
मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणाऱ्या लोकांसोबत जेवतात. हे शिवसेनेतील नेत्यांना समजत नाही का? हे सर्व ढोंगी आहेत असा घणाघात देखील राज ठाकरे यांनी शिवसेनेवर लगावला. यांचं हिंदुत्व फक्त पक पक एवढ्यापुरतंच आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यांचं सरकार होतं. त्यावेळी भारतातून कारसेवक उत्तर प्रदेशमधील अयोध्यामध्ये गेले होते. तेव्हा आपल्यातील सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत मी शरयु नदीमध्ये तरगंताना मी पाहिली होती. त्यामुळे मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं. मात्र ज्या कारसेवकांची प्रेत तरंगत होती त्या तिथल्या जागेचं पण मला दर्शन घ्यायचं होतं. असंही ते म्हणाले.
त्यांना आता 14 वर्षानंतर जाग आली आहे. माफी मागण्याचा विषय आहे तर गुजरात मधील अल्पेश ठाकूर म्हणून एक गृहस्थ आहे. 2017 गुजरातमध्ये उत्तर, बिहार मधील एका व्यक्तीकडूून एका महिलेचा बलात्कार झाले. त्यानंतर त्या रात्रीत गुजरातमधून 10 ते 15 हजार लोकांना गुजरात मधून हाकलून देण्यात आलं. ते लोकं मग मुंबईत आले. त्यानंतर ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथून मग कोण माफी मागणार आहेत ? असा सवाल देखील त्यांनी केला.