पुणे : अयोध्या दौरा स्थगित केला असल्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी आज पुण्यातील सभेच आयोजन केलं आहे. त्यावर काहींना दुख तर काहींना आनंद झाला. त्यासाठीच मधले दोन दिवस दिले होते. पुण्यात अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाला. त्यावर माझा लक्षं होतं. त्याबद्दल मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून माहिती आहे. त्यावरून मला असं समजलं की हा एक प्रकारे सापळा आहे. त्या सापळ्यामध्ये आपण अडकले पाहिजे नाहीत. या गोष्टीसाठी रसद ही महाराष्ट्रातून पोहचली. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपसली होती . त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आराखडा आखला गेला असंही ते म्हणाले.
दरम्यान, सभेसाठी एसपी काॅंलेज त्यानंतर नदीपात्राचं ठिकाण ठरलं होतं. मग आम्हाला नाही तर कुणालाच नाही. मात्र पाऊस कोणत्याही क्षणी पडू शकतो. मग निवडणुका नाही तर कशाला पावसात भिजत बसा. अलिकडेच मी पुण्यात आलो होतो परंतु कमरेला आणि पायाला त्रास होत असल्याने मी पुन्हा मुंबईला गेलो. 1 मे रोजी त्यासाठी शस्त्रक्रिया करायला जाणार आहे. असंही ते म्हणाले.