वैजापूर : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलं आहे. मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. आज देशभरात भारत बंद पाळला जात असून, त्याचे पडसादही ठिकठिकाणी दिसून येत आहे.
केंद्र सरकारचे अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व भारत बंद ला जाहिर पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने दिल्याने भारत बंद साठी वैजापुर महाविकास आघाडीच्या वतीने भारत बंद पुकारत स्टेशन रोड, टिळक रोड, साखरे चौक, महाराणा चौक अशा ठीक ठिकाणी फेरी काढत सर्व व्यापारी वर्गानी दुकान बंद केल्या. यावेळी सर्व व्यापारी वर्गाने भारत बंद ला पाठिंबा देत सर्वांनी दुकान बंद केल्याने आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांनी सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत सदाफळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रतापदादा निंबाळकर, सभापती भागिनाथ दादा मगर, शहर प्रमुख राजेंद्र पा साळुंके, शहर अध्यक्ष काझी साहेब सर्व शेतकरी, उपतालुका प्रमुख, नगरसेवक व महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also :
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन
मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट