मुंबई : राज्यता मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच धनगर समाजाकडूनही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यवर जोर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर धनगर समाजाचे राजकारण्यांनी आतापर्यंत फक्त राजकीय शोषण, रक्तशोषण केले. पण आरक्षणासाठी धनगर समाज आता शोषण करणाऱ्या सरकारलाच रक्तादानच्या हजारो बाटल्या देणार असल्याची माहिती आमदार गोपचंद पडळकर यांनी दिली आहे.
धनगर समाजाने आरक्षणासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने केली आहे. प्रत्येक पक्षाने आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या समाजाला वापरले. त्यांचे राजकीय शोषण केले. अनेक ठिकाणी मेंढपाळावर हल्ले झाले. त्यांच्या रक्त शोषण केले.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रक्तदान केलेल्या 10 हजार बाटल्या राज्य सरकारकडे देणार आहेत. हे रक्त राज्यातील गरजूंना उपयोगी तर पडेलच, पण या माध्यमातून सरकारने आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे हा आग्रह असणार आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
Read Also :
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा ; हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक https://t.co/m9rl1xFLQe #HathrasCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020