अहमनगर: महाराष्ट्रात जागतिक महामारीने थैमान घातले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये या महामारीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. अहमदनगर मध्ये नुकताच ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. त्यानंतर रात्रीतून ऑक्सिजन नगर मध्ये आला मात्र या मध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण झाले आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. आता अहमदनगरचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी आता प्रशासनातील मोठ्या पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांची देखील अत्यंत संतप्त शब्दांमध्ये खरडपट्टी केली आहे.
अहमदनगर मध्ये जागतिक महामारीने संक्रमण असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या नगरमध्ये रुग्णांना बेड्स मिळणे कठीण झाले आहे. रेमेडीसीवरचा तुटवडा पडला आहे. या संदर्भात मी निकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन नगर साठी ज्यादा मदत आण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरी देखील जागतिक महामारीच्या उद्रेकामध्ये जिल्हा प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत, असल्याची टीका आमदार संग्राम जगाताप केली. जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर बंद पडतो, याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना फोन केला असता, त्यांनी तो उचलला नाही. जिल्हाधिकारीच जर असे वागत असतील तर बाकीचे अधिकारी काय करत असतील याबाबात शंका आहे.
. याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील परिस्थितीबाबत त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी आरोग्यमंत्री श्री राजेशजी टोपे यांनी अहमदनगर शहरासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.— MLA Sangram Jagtap (@sangrambhaiya) April 20, 2021
रेमेडीसीवरचा पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. एन. कातकडे व उपजिल्हाधिकारी किशोर कदम या दोन अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. या दोन्ही अधिकायांणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम हे फोन उचलत नाहीत, अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. या अधिकायांची मनमानी सुरू आहे. जनतेसाठी खुले केलेले किती संपर्क क्रमांक बंद असतात, याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.